आरव गजेन्द्र राउत एजुकेशन मिरर के नियमित लेखक हैं।
मी आतापर्यंत चार शाळा बदलल्या कारण जॉब मुळे माझ्या बाबांची शिफ्टिंग होत होती .माझी पहिली शाळा म्हणजे डोंबिवली महानगरपालिकेची बालवाडी. तिथे मी खूप सुट्ट्या मारत होतो कारण मला शाळेत जायला आवडत नव्हते तरीही तिकडच्या शिक्षिका मला रागवत नव्हत्या. त्यावेळी मी खूप छोटा होतो यामुळे मला तिथले फार काही आठवत नाही.
त्यानंतर मी माणगावला राहायला गेलो. तिथल्या शाळेचं नाव आदर्श मराठी प्राथमिक शाळा असे आहे. तिथे पण मी बालवाडीत होतो. मला तिथले सगळ्यात जास्त आवडणारे शिक्षक म्हणजे गुरुजी , कारण जेव्हा पण मी वर्गात रडत होतो तेव्हा ते मला वर्गाच्या बाहेर नेऊन एका झुल्यावर बसवून माझं रडणं शांत करून शिकवत होते . ते शाळेच्या प्रिन्सिपलचे बाबा होते. ते एक वेळा माझ्या माणगावच्या घरी आले तेव्हा मी खूप खुश झालो, मी त्यांना इंग्रजीमधले 1, 2, 3 म्हणून दाखवले. मी जानेवारी २०२० मध्ये जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा मी माझ्या पहिल्या शाळेला भेट दिली . तिकडचे शिक्षक म्हणत होते कि तू एक मोठा माणूस बनशील. मग माझे बाबा आणि मी माणगावला माझ्या बाबांच्या मित्रा कडे गेलो.
मला आठवलं कि इथे तर माझी शाळा आहे तर मी माझ्या शाळेत गेलो. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा तिथे तिळगुळ चा कार्यक्रम सुरु होता. त्यांनी मला ओळखलं नाही तेव्हा मी म्हटलं कि मी इथे शिकलेलो आहे तरीही त्यांना आठवलं नाही, मग माझं नाव सांगितल्यावर त्यांनी ओळखलं आणि त्यांनी म्हटलं कि हा पहिलीत गेला काय? माझे बाबा म्हणाले कि याला इथून जायला चार वर्ष झाले आता हा चौथीत गेला आहे, त्यांनी हा प्रश्न विचारल्यावर मला शंका आली कि त्यांनी मला पूर्णपणे ओळखल नाही . गुरुजींनी मला शाळेत अभ्यास करायची आणि वर्गात न रडण्याची शिकवण दिली .
दुसऱ्या वर्षी मी फर्स्ट मध्ये गेलो . अर्पिता मॅडम मला क्लास टीचर होत्या . त्या माझ्या पाठीमागच्या सोसायटी मध्ये राहत होत्या . मी कर्सिव्ह रायटिंग तेव्हाच शिकलो, त्यावेळी मी क्लासमधे फर्स्ट येत होतो. त्या मला जास्त रागवत नव्हत्या कारण मी तेव्हा खोडकर नव्हतो. नंतर मी अंतिम परीक्षेत फर्स्ट आलो आणि दुसरीत गेलो. मला वाटलं कि गीता मॅडम क्लास टीचर राहणार पण मॅडम तर बदलल्या होत्या. आता आम्हाला अदिती मॅडम होत्या . त्या सगळ्यांना समान समजत होत्या.
त्या आम्हाला छान-छान गोष्टी सांगत होत्या आणि गेम पण खेळवत होत्या. त्या म्हणत होत्या कि जर तुम्ही काम लवकर करणार तर तुम्हाला जास्त वेळ गेम खेळायला भेटणार. माझ्या बाबांना स्वताःच काही काम करायचं होतं म्हणून ते वापस अमरावतीला शिफ्ट झाले, एक घर बनवलं आणि मला श्रीराम प्राथमिक शाळेत दाखल केलं, माझी ऍडमिशन डायरेक्ट चौथीत केली. चौथ्या वर्गाला शिकवायला टाले सर होते . सर आम्हाला नेहमी हसवत-हसवत शिकवतात आणि आम्हाला तें खूप वेळा काडीने मारत होते पण त्यांचा मार आम्हाला कधी लागलाच नाही कारण ते आम्हाला खूप हळू मारत होते. असे मला आतापर्यंत विविध शिक्षक भेटले.
(एजुकेशन मिरर के फ़ेसबुक पेज़ और ट्विटर हैंडल से जुड़ सकते हैं। इसके साथ ही साथ वीडियो कंटेंट व स्टोरी के लिए एजुकेशन मिरर के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करने के लिए यहां क्लिक करें। आप भी एजुकेशन मिरर के लिए अपने लेख educationmirrors@gmail.com पर भेज सकते हैं। )
